कार्यक्रमाच्या समरोपीय भाषणात पु. धनश्री दीदी तलवलकर म्हणाल्या की ब्राह्मण समाजाचे कार्य संस्कार क्षम देश घडवने आहे. त्या साठी आपण सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. जे आदिवासी आपल्या पर्यंत पोहोचू शकत नाहित, त्या आदिवासी पर्यंत आपण पोहोचावे. त्याना रामरक्षा आदि स्तोत्र शिकवावे. उच्चारण शुद्धता हा नंतरचा विषय झाला. पण त्याना आधी शिकवायला तर सुरवात केलि पहिजे. कृन्वन्तु विश्वं आर्यम हा नारा साकार करायचा असेल तर स्वतः च्या जाती पुरता संकुचित विचार न करता सगल्याना सोबत घेवुनच हा विचार जगाच्या कान्या कोपरयात पोहोचू शकतो. धर्माच्या रक्षनासाठी देशाटन करुन सर्वांपर्यंत पोहोचन्याचे काम आपण केले पाहिजे.